पोलिसात तक्रार दिल्याचा राग – तिघांवर प्राणघातक हल्ला

On: November 19, 2023 12:32 PM

जळगाव : पुर्वी पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून चौघांनी इतर साथीदारांच्या मदतीने पिता पुत्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथील संभाजी कौतिक पाटील यांच्या तक्रारीवरून सात जण आणि इतर अशा बिलवाडी येथील सर्वांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्यावेळी आपल्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून रोशन पाटील, अजय पाटील दीपक पाटील, भूषण पाटील यांनी संभाजी पाटील व त्यांची मुले सर्वेश आणि भावेश यांना कपाशी उपटण्याचा लोखंडी चिमटा, चाकू, गुप्त्या, तलवार यांचा वापर करून मारहाण करत गंभीर जखमी केले. संभाजी पाटील यांनी पोलिसांना फोन केला असता सर्व हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला यशवंत प्रल्हाद पाटील, सोमनाथ पाटील, रोशन पाटील, सागर पाटील, अजय पाटील, दीपक पाटील, भुषण पाटील व इतर 14 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहुर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment