तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या

जळगाव : भुसावळ – यावल रस्त्यावरील तापी नदी पुलावरुन न्हावी येथील तरुणाने उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

विरेंद्र रामा कोळी (40)रा. न्हावी ता. यावल असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आत्महत्या करण्यापुर्वी विरेंद्र कोळी हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने आला होता. दुचाकी तापी पुलावर लावून नंतर त्याने थेट तापी नदीत उडी घेतली.

त्याच्या दुचाकीवरील क्रमांक अस्पष्ट असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यास वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे आपले सहकारी मोहंमद अली सय्यद, यावल तालुक्यातील न्हावी येथील विरेंद्र रामा कोळी, विशाल साळुखे, चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इतरांच्या मदतीने मयत विरेंद्र कोळी याचा मृतदेह शव विच्छेदनकामी यावल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी धनराज कोळी यांनी दिलेल्या खबरीनुसार भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. विरेंद्र कोळी याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here