नगर जिल्ह्यात विस हजार कोंबड्यांची विल्हेवाट?

On: January 21, 2021 10:23 PM

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मरण पावलेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मरण पावलेल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे उघड झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील जवळपास वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली असल्याचे समजते.

श्रीगोंदा, जामखेड यासह नगर तालुक्यातील काही वन्य पक्षी मृतावस्थेत सापडले होते. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोंबड्यांना मात्र बर्ड फ्लू झाल्याचे आढळले नव्हते. दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मरण पावलेल्या कोंबड्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच प्रशासन सतर्क झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment