राज्यात बदल्यांचा मुहुर्त लांबणीवर

On: May 10, 2021 7:59 PM

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचा विषय तुर्तास लांबणीवर टाकला आहे. राज्यातील कोणत्याही अधिका-यांच्या बदल्या 30 जुनपर्यंत होणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. कोरोना काळात केवळ सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे, अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणे, एखादी गंभीर बाब असल्याची तक्रार आली तरच अपवादात्मक बदली केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने हा आदेश काढला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे संकट मोठे असून अशा कालावधीत बदल्या केल्या जाऊ नये असे आदेश सचिवांसह अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment