जळगाव : सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासह विविध मागण्यांसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणाची महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली.
या उपोषणाची स्थळी ना. दिलीप वळसे पाटील, ना. एकनाथ शिंदे आदींनी उपस्थिती देत राज्य सरकारच्या अंतर्गत येणा-या मागण्या मान्य केल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र देत त्यांचे उपोषण सोडण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या भुमीकेचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी आभार व्यक्त केले आहे. तसेच या मागण्यांचा पाठपुरावा देखील तातडीने करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.







