मुंबई विमानतळावरील आगीच्या घटनेत जीवितहानी नाही

On: January 10, 2022 7:43 PM

मुंबई : सांताक्रूझ येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागण्याची घटना आज घडली. एअर इंडियाच्या विमानाला पुशबँक देणा-या वाहनाला लागलेल्या आगीने मुंबई जामनगर या विमान उड्डाणाला विलंब झाला. या विमानात एकूण 85 प्रवासी संख्या होती.

या आगीने विमानाचे नुकसान व जीवितहानी झालेली नाही. या घटनेने विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. या घटनेच्या माध्यमातून हा घातपात होता की अपघात याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment