गेल्या २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात मुंबई व रत्नागिरी पोलीस दलातील प्रत्येकी एक असे दोन अधिकारी व इतर जिल्हयातील सहा कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलिसांचा आकडा २०२ च्या वर गेला आहे.

संपुर्ण राज्यात १९ हजार ७५६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात २ हजार १४२ पोलीस अधिकारी आहेत. यापैकी १ हजार ६६२ पोलीस अधिका-यांसह एकूण १५ हजार ३८० जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

३ हजार ७२४ पोलिसांवर विविध रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. यात गेल्या २४ तासांत ३७१ कोरोनाबाधित पोलिसांची भर पडली आहे. गेल्या चोवीस तासात ८ पोलिसांनी आपला जीव गमवला आहे. यात मुंबई व रत्नागिरी पोलीस दलातील प्रत्येकी एक अधिकारी तसेच ठाणे शहर, नाशिक शहर, जळगाव, उस्मानाबाद, नंदुरबार, सांगली येथील सहा पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here