प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आकाश दहेकर यास अटक

जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी आकाश अरुण दहेकर (34) रा. कंजरवाडा जळगाव यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश यास त्याचे वकील ॲड. केदार भुसारी यांनी पोलिस स्टेशनला आणून हजर केले आहे.

आकाश अजय सोनार या तरुणाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार त्याला 3 मे रोजी मयुर बागडे याने रामनवमीच्या दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी कंजरवाडा परिसरात बोलावले होते. त्यानुसार आकाशसोबत ललित दिक्षीत, बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी असे सर्वजण तेथे गेले. त्यावेळी मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबु कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतरांनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश दहेकर याने बबलु धनगर याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. मात्र तो हल्ला बबलु याने चुकवला. मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबू कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतर अनोळखी काही तरुणांनी हल्ला केला. यात वाहनांचे देखील नुकसान झाले होते.

या घटनेतील आकाश दहेकर यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आकाश दहेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध धुळे शहर, रामानंद नगर जळगाव आणि जिल्हा पेठ जळगाव या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे व त्यांचे सहकारी किरण पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here