लाखो रुपयांचे सामान जाळणाऱ्या चौघांना अटक

जळगाव : नुकसान करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून आग लावून अकरा लाख रुपयांचा किराणा, हार्डवेअर, फर्निचर आणि शालेय वस्तूंचा सामान जाळून नुकसान केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत आहे.

विकास नाना पाटील यांचे सावरला ता. जामनेर येथे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानाला मुकेश गजमल कोळी, अविनाश विश्वनाथ कोळी, प्रमोद नारायण पाटील, सागर भगवान पाटील सर्व रा. सावरला तालुका जामनेर अशा चौघांनी 15 व 16 जून दरम्यान पेट्रोल टाकून आग लावली होती. या गुन्ह्याचा तपास हे काँ. जनार्दन सोनोने करत आहेत 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here