पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून मृत्यु

जळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही बालकांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली आहे.  निलेश राजेंद्र अहिरे (17) आणि सावन शिवाजी पाटील (15) अशी शिरसोली येथील रहिवासी असलेल्या दोन्ही बालकांची नावे आहेत. शिरसोली गावानजीक नायगाव धरणातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा बालकांचा मृत्यू ओढवला असल्याचे म्हटले जात आहे.

दोघा बालकांना परिसरातील रहिवाशांनी बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. श्रावगे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला हे.कॉ. राजेंद्र उगले यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. या घटनेचा तपास पोलिस कर्मचारी विकास सातदिवे आणि भरत कोळी करत आहेत.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here