दोघा भावांच्या हत्येप्रकरणी भुसावळला गुन्हा

जळगाव : जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांचा खून केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुयावळ तालुक्यातील कंडारी या गावी शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

शांताराम भोलानाथ साळुंखे आणि राकेश भोलानाथ साळुंखे अशी हत्या झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. विकी सपकाळे आणि सागर अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जुन्या वादातून हा खुनाचा गुन्हा घडल्याचे समोर येत आहे. हल्लेखोरांची नावे पोलिसांना समजली असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here