नातेवाईकांचे टोमणे झाले असह्य – तरुणाने केली आत्महत्या

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : दोन मुले असलेल्या विवाहितेसोबत लग्न केल्यामुले नातेवाईकांनी टोमणे मारण्याचे काम सुरुच ठेवले. सततच्या टोमण्यांमुळे उद्विग्न झालेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी घडली.

निकेश तिरसिंग राजपूत (२७), कुसुंबा, ता.जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडे अकरा वाजता खेडी येथे घडलेल्या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

निकेश राजपूत या तरुणाचे निवडक नातेवाईकांच्या हजेरीत लग्न झाले होते. तो पत्नीसोबत खेडी येथे भाड्याच्या घरात रहात होता. तणावात असलेल्या निकेशने रात्री कुणाला काही न सांगता राहत्या घराच्या मागच्या खोलीत जाऊन कडी लावून घेतली. घरातील छताच्या कडीला दोरी बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here