मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या तपासानंतर मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी तपासदेखील आता एनआयए कडे गेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले असल्याची माहिती एनआयए अधिकारी जया रॉय यांच्याकडून देण्यात आली आहे.
निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणी वाढल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे. एटीस कडील तपास एनआयए कडे गेल्यामुळे राज्य सरकारची नामुष्की झाल्याचे देखील बोलले जात आहे.