मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिरे उघडण्याची मागणी सुरु होती. विरोधी पक्षाकडून याप्रश्नी राज्य सरकारवर टिका केली जात होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून योग्यवेळी धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जाईल असे सांगीतले जात होते.
अखेर राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर जनतेसाठी मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याची घोषणा केली आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे घोषित केले आहे.
मंदीरात अथवा कोणत्याही धार्मिक स्थळी वावरतांना चेह-यावर मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.









