जळगाव जिल्ह्यात 7 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 एप्रिल 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच अथवा पाचपेक्षा जास्त लोकांचा समुह करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नसल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here