नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या अथवा घेवू नयेत या विषयावरुन बराच खल झाला. सदर प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सर्वोच्च न्यायालाने यावर सुनावणी करताना पुढील सुनावणी १० ऑगस्टपर्यंत ढकलली आहे.