महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्याचे  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आवाहन 

जळगाव– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विचारांद्वारे भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. व्यक्ती निर्माणातुन राष्ट्र निर्माणाची संकल्पना साकारीत सर्वोदयाचा विचार त्यांनी समस्त जगातला दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा व मानवतेच्या संदेशाला मानवंदना देण्यासाठी भारतात हा दिवस “हुतात्मा दिन” म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध संस्था, कार्यालये, प्रतिष्ठानांनी व नागरिकांनी उद्या सोमवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी दोन मिनिटांचे मौन पाळून राष्ट्रपित्याला श्रद्धांजली द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here