कारच्या चाकाची हवा जात असल्याचे सांगून तीन लाख रुपये गायब

जळगाव : कारच्या चाकातील हवा जात असल्याचे सांगून किराणा दुकानदाराच्या कारमधील तीन लाख रुपये असलेली बॅग गायब करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सीताराम परदेशी हे नवीन रायपूर येथील किराणा दुकानदार आहेत. ते किराणा माल घेण्यासाठी त्यांच्या ताब्यातील कारने जळगावला दाणा बाजारात 21 मार्च रोजी आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी दाणा बाजारातील मोहन ड्राय फ्रुट्स येथे कार उभी केली होती.

विकत घेतलेले नारळाचे पोते त्यांनी कारमध्ये ठेवले आणि पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर येवून बसले. दरम्यान एका इसमाने त्यांना जवळ येवून सांगितले की तुमच्या कारच्या मागच्या चाकातील हवा कमी होत आहे. त्यामुळे संदीप परदेशी यांनी उठून टायरची हवा तपासून पाहिली. कारच्या टायरची हवा कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पुन्हा कारमध्ये जागेवर येवून बसले.

मात्र यावेळी त्यांनी साईडच्या सीटवर ठेवलेली 3 लाख 5 हजार रुपये असलेली बॅग त्यांना दिसली नाही. कारमधील हवा कमी होत असल्याचे सांगणारा इसम देखील त्यांना दिसला नाही. आपली दिशाभूल करुन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध त्यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक रमेश शेंडे पुढील तपास करत आहेत.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here