जळगाव जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.

दि. 9 ते 23 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी करावी असे अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या कालावधीत ईस्टर संडे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे सण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here