गाणे बदलल्याचा राग – चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी

जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात सुरु असलेले गाणे बदलल्याचा राग आल्याने एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील म्हाडा कॉलनी येथे घडली. 7 जूनच्या रात्री घडलेल्या या घटने प्रकरणी 8 जुलै च्या रात्री एमआयडीसी पोलिस स्टेशनला जखमीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भरत महाले असे अयोध्यानगर येथील रहिवासी जखमीचे नाव आहे.

सचिन महाले हा तरुण एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला त्याच्या मित्रांसोबत गेला होता. त्यावेळी त्याने सुरु असलेले गाणे बदलण्यास सांगितले. सुरु असलेले गाणे बदलण्यास सांगीतल्याचा तिघांना राग आला. त्यातील दिपक चव्हाण आणि आकाश लासुरे या दोघांनी सचिन महाले यास दगडाने मारले. दरम्यान गणेश लोहार याने त्याच्या खिशातील चाकूने सचिनच्या छातीवर उजव्या बाजूस भोसकून गंभीर दुखापत केली. तु जर पोलिस स्टेशनला आमच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर यापेक्षा जास्त मारु असा त्याला तिघांनी दम दिला. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here