घाटंजी कृ.उ.बा समिती सभापती नितीन कोठारी यांचे दोन्ही अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले.. 

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी येथील संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न  खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १७ अन्वये २२ ऑगस्ट २०२४ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे (Writ Petition NO. ५०४८/२०२४) व आशिष सुरेशबाबू लोणकर (Writ Petition NO. ५०५२/२०२४) या दोन संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ आदेशाविरुद्ध आवाहन याचीका दाखल केली होती. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी सदरचा आदेश रद्द करुन सोमवारी (दि. ७/४/२०२५) खारीज केला आहे. तसेच दोन्हीही संचालकांना मुळ कार्यालयात (Apmc, Ghatanji) संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांची बाजू उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी मांडली. 

तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी गैर अर्जदारांना ४ आठवड्याची मुदत दिली होती. तरीही गैरअर्जदार तर्फे आणखी दोन आठवड्याची मुदत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मागीतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी, आपल्या आदेशात गैर अर्जदारांनी मा. सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलेले असतांना अशी कोणतीही विनंती मंजूर करण्याचे कारण नाही, असे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी दिवाणी अर्ज क्रंमाक १०७५ व १०७६ हे दोन्हीही अर्ज मंगळवारी (दि. ०६/०५/२०२५) फेटाळून लावले. अर्जदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे, आशिष लोणकरतर्फे ॲड. वाय. एन. सांबारे यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर गैरअर्जदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी यांची बाजू ॲड. पी. मोहता, ॲड. आर. व्ही. गहीलोत यांनी मांडली. 

कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजीचे संचालक अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर व इतर शेतक-यांनी दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी कापसाचा सुरू असलेला लिलाव बंद पाडुन रास्तारोको करण्यात आल्याचा आरोप करुन कृषी उत्पन्न बाजार समितीने २७ जानेवारी २०२४ च्या झालेल्या मासिक सभेस सभापती भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी व इतर संचालकांनी ठराव क्रमांक ६ प्रमाणे गैरअर्जदार अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर यांना पदावरुन दुर करण्याबाबतचा ठराव १० विरुद्ध ६ मतांनी पारित केला. सदर आदेशाला विचलीत होऊन संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आवाहन याचीका दाखल केली. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी आपल्या आदेशात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी यांचेवर चुकीची कारवाई केल्याचा ठपका ठेवून गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती एम. एस. जवळकर यांनी संचालक अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर यांच्या दोन्ही याचिका मंजूर केल्या असून याचिकाकर्त्यांना मुळ कार्यालयात (Apmc, Ghatanji) संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याचिकाकर्ता अभिषेक ठाकरे व आशिष लोणकर ह्यांची बाजु वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर व ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी मांडली.

दरम्यान, गैरअर्जदार कृषी उत्पन्न समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी यांचे दोन्हीही अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी (दि. ०६/०५/२०२५) फेटाळल्याने घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here