अ‍ॅड. श्रीहरी बागल यांचा दौरा

जळगाव : राष्ट्रीय स्वराज्य सेना या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप पवार व राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांचा पश्चीम महाराष्ट्रासह नाशीक व धुळे जिल्हयाचा दौरा शनिवार 19 सप्टेबर पासून सुरु झाला आहे.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेती सह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर होवून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी अशी राष्ट्रीय स्वराज सेनेची मागणी आहे. तसेच मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे अशी देखील मागणी आहे.

त्यासाठी विविध जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका या दौ-यात घेतल्या जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी यांना दौ-याप्रसंगी दिले जाणार आहे. शेतकरी वर्गासोबत चर्चा करुन विचारविनीमय देखील केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here