धान्य उत्पादक शेतक-यांची अवस्था बिकट – राजकुमार बडोले

On: October 6, 2021 2:42 PM

गोंदीया (अनमोल पटले) : धान्य उत्पादक शेतक-यांची अवस्था अतिशय बिकट असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना वेळ नसल्याचे भाजपाचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे. शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गोंदीया जिल्ह्यात आले असतांना ते बोलत होते.

गोंदीया जिल्ह्यातील अर्जुनी मोर, सडक अर्जुनी, गोरेगाव व गोंदिया तालुक्यातील धान्याच्या नुकसानाची स्थिती पाहण्यासाठी त्यांनी दौरा केला होता. त्यावेळी ते बोलत होते. नवेगांव बांध, परसोडी रैयत, खोबा, पाटेकुरा, मुंडीपार, कोरणी येथील शेतक-यांच्या शेतातील पिकांची पाहणी त्यांनी केली. शेतक-यांनी कष्टाने उभे केलेले पिक गाद, करपा, मावा या रोगानी नष्ट झाले आहे. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही. त्यामुळे जवळपास तिस टक्के पेरणी झाली नाही.

शेतक-यांना पिक कर्ज मिळाले नाही त्यामुळे त्यांनी नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घेत पेरणी केली. मात्र शेतक-यांना सरकारकडून पिक कर्ज मिळाले नाही. ज्या पिकांच्या भरवशावर शेतक-यांनी सावकाराकडून कर्ज घेतले ते पिक गाद करपा या रोगाने नष्ट केले. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. गोंदीया जिल्ह्याच्या दौ-यावर आलेले माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढे बोलतांना म्हटले की सध्याच्या पालकमंत्र्यांना गोंदीया जिल्ह्यासाठी वेळ नाही. धान्य कसे लावतात हे त्यांना माहिती नाही. निवडणूका आल्या म्हणजे त्यांना शेतक-यांची आठवण येते. भाजप सत्तेत असतांना शेतक-यांचे नुकसान झाले म्हणजे सरासरी वीस टक्के भरपाई देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. सगळ्या शेतक-यांची वर्ग दोन जमीन वर्ग एक करण्याचा क्रांतिकारी निर्णय भाजपच्या कार्यकाळात घेण्यात आला. त्या काळात 16 क्विंटल प्रती एकरी धान्य घेतले तेव्हा वीस टक्के नुकसान भरपाई देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment