मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत सहा कुलगुरुंची समिती गठीत झाली. ही समिती आज 30 ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत होणा-या बैठकीत आपला अहवाल तयार करणार आहे. अशी माह्ती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे.
विद्यापीठ आयोगाच्या निर्देशांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पुर्ण करायची आहे. ही मुदत शक्य होत नसल्यास ती मुदत पुन्हा वाढवून घेण्यासाठी सरकारला विद्यापीठ आयोगाकडे विनंती करता येणार आहे.








