जळगाव दि.०१ प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धनातून हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राजोरा, ता. यावल येथील जि. प. शाळा परिसर मध्ये १५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे देवेंद्र पाटिल, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, जैन फार्मफ्रेश फूडचे कोमल वाघ, मुख्याध्यापक रविंद्र पाटील, शेतकरी प्रशांत पाटिल, भगवान पाटिल व पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन आभार वैशाली पाटील यांनी केले.
शाळा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे आणि पुढील पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लावण्यात आलेल्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थ मिळून घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. Responsible sourcing program अंतर्गत जैन फार्मफ्रेश फूड लि. व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा प्रकारचे वृक्षारोपण मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहेत.







