गांधी रिसर्च फाउंडेशन – ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर

जळगाव : कोरोना वैश्विक महामारीच्या प्रसंगानुसार गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘बा-बापू 150’ जयंती वर्ष अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गांधीजींचे विचार नव्या पिढीत संस्कारित होण्याच्या उद्देशान घेण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतासह विविध देशांतून सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

प्रथम गटातून अन्वी प्रभाकर जयभाये (अकोला), दुस-या गटातून निकिता दत्तात्रय गावडे (पुणे), तिस-या गटातून शुभम रंगराव पाटील (पुणे) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक, पर्यावरण संतुलन, आरोग्य विषयक उपक्रमांचा या उपक्रमात समावेश आहे. महात्मा गांधी यांनी भारतच नव्हे तर सा-या विश्वात स्वत:चे विचार तसेच आपल्या कृतीशिल आचरणातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महात्मा गांधीजी यांचे विचार पुढील पिढीमध्ये संस्कारित होण्याच्या उद्देशाने ऑनलाईन राष्ट्रीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेत महात्मा गांधीजींच्या विचारांचे मंथन केले. या स्पर्धेत मुलांपेक्षा मुलींनी मोठ्या प्रमाणात घेतलेला सहभाग उल्लेखनिय होता.
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटासाठी ‘गांधी माझे हिरो’, दुस-या गटासाठी ‘आज गांधीजी असते तर काय करते?’ व तिस-या गटासाठी ‘अहिंसेचे जीवनातील नियम’ असे विषय ठेवण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना आपल्या इच्छेनुसार भाषा निवडून व्हिडीओ तयार करुन गांधी रिसर्च फाऊंडेशनकडे पाठवायचा होता. सदर स्पर्धा तीन गटामध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिल्या गटात इयत्ता 5 वी ते 8 वी, दुस-या गटात 9 वी ते 12 वी तसेच तिस-या गटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओरिसा आदी राज्यातील स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होते. गुजरात विद्यापिठामध्ये शिक्षण घेणा-या झांबिया देशातील विद्यार्थ्यांनीदेखील आपला सहभाग नोंदवला.

सहभागी विद्यार्थ्यांच्या मोजक्या व्हिडिओ मधील काही निवडक व्हिडीओ गांधी तीर्थच्या सोशल मिडीया फेसबुक व यु ट्यूब वर प्रसारित करण्यात आले होते. या व्हिडीओला देश-विदेशातील नागरीकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. जवळपास दोन लाख दर्शकांनी या साईटवर जाऊन हे व्हिडीओ पाहिले. जवळपास साठ हजाराच्यावर दर्शकांनी या व्हिडीओला लाईक केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सोशल मीडिया पेज https://www.facebook.com/gandhiteerth/live/याhttps://youtu.be/AUJHAHP-ImAवर वर हे व्हिडोओ आपणास पाहता येतील.

प्रथम गटात अन्वी प्रभाकर जयभाये (इयत्ता 5वी, प्रतिभा किड्स स्कूल, अकोला) या विद्यार्थीनीने पहिला क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाने प्रगती प्रदीप गोंदकर (इयत्ता 8वी, सिल्व्हर महोत्सवी विद्यालय, बार्शी) याने तर तिस-या क्रमांकाने मुग्धा विजय याज्ञिक (इयत्ता 5वी, प्रताप विद्यामंदिर, चोपडा) असे विद्यार्थी विजयी झाले. दुसऱ्या गटात पहिल्या क्रमांकाने निकिता दत्तात्रय गावडे (इयत्ता 10वी, गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे) तसेच द्वितीय क्रमांकाने एम. आयशा सामिहा (इयत्ता 9 वी, लिटल फ्लॉवर पब्लिक स्कूल, तिरुनेलवेली तामिळनाडू), तिस-या क्रमांकाने विष्णुप्रिया सक्सेना (12वी, दयावती मोदी अकादमी, मोदीपुरम मेरठ) तसेच महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांकाने शुभम रंगराव पाटील (पुणे), द्वितीय भक्ती अरविंद देशमूख (पुणे), तिस-या क्रमांकाने निकिता कुमारी (कुरूक्षेत्र, हरियाणा) असे विद्यार्थी विजयी झाले. अंतिम विजेत्यांची उदघोषणा प्रा. जी. व्हि. व्हि. प्रसाद, प्रा. जी. पालाणीथूराई तसेच के. एम. नटराजन यांनी केली.

चार सत्रात विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या व्हिडिओचे परिक्षण यावेळी करण्यात आले. तंत्रज्ञान संबधी विषयाची तपासणी तसेच वकृत्वासाठी घेण्यात आलेल्या विषयाची जाणिव, तत्व आणि नैतिकतेबद्दल तपासणी व त्यानंतर परिक्षकांच्या परिक्षणाच्या माध्यमातून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

यावेळी परिक्षक म्हणून गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, प्रा. विश्वास पाटील यांनी योग्य ते न्यायपूर्ण परिक्षण केले. प्राथमिक परिक्षण ज्ञानेश्वर शेंडे व हर्षल पाटील या दोघांनी केले. सौ. अंबिका जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन – गांधी रिसर्च फाउंडेशनमधील शिक्षण विभागाचे डीन डॉ. जॉन चेल्लादूराई, प्रा. अश्विन झाला, नितीन चोपडा . सुधीर पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी योग्य तो समन्वय साधला. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे चंद्रशेखर पाटील, कु.योगिता चौधरी, अशोक चौधरी, विश्वजित पाटील, दुर्वास नलगे, अनुभूती स्कूलचे पार्वती गोस्वामी तसेच हुसेन भाई यांनी देखील योग्य ते सहकार्य केले. तंत्रज्ञानाबाबत योगेश संधानशिवे, जगदिश चावला, भूषण मोहरीर, चेतन पाटील व हिमांशू पटेल आदींनी योग्य ते सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here